Posts

Showing posts from January, 2022

घरात हसरे तारे

 *घरात हसरे तारे* रात्रीचा आठचा सुमार. सलग तीन दिवसांची हाॅस्पिटलमधली ड्युटी संपवून गीता घरी आली. सरकारी इस्पितळातील कोरोना वाॅर्डमध्ये ती मुख्य परिचारिका म्हणून कर्तव्य बजावत होती. तिच्या मृदू बोलण्याने रुग्णांना धीर येत असे. रुग्णांच्या मनात ती आशावाद जागृत ठेवी. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांचे पथ्यपाणी, औषधे सारं काही ती न कंटाळता करत असे. सलग तीन दिवस जराही विश्रांती न घेता ड्युटी करून आज ती घरी परतली होती.       लॅच की नं दरवाजा उघडून गीता घरात शिरली अन् काय आश्चर्य! दरवाज्याचा आवाज ऐकून बेडरूम मधून बाहेर आलेली सायली धावत पुढे येऊन तिला बिलगली.  क्षणभर आपण अनुभवतोय ते स्वप्न की सत्य हेच गीताला उमगेना. "आय लव्ह यू मम्मा" ह्या सायलीच्या शब्दांनी गीता भानावर आली व काहीच न समजल्यामुळे गोंधळून सायलीकडे पहात ती तशीच उभी राहिली. आत्तापर्यंत तिचा तिरस्कार करणारी तिची सावत्र मुलगी  आज अचानक कशी बदलली हेच तिला कळेना. पण कौतुकाने हसत बेडरूममधून बाहेर आलेल्या अविनाश ने सर्व खुलासा केला अन् गीताच्या आनंदाला पारावार उरला नाही.       झाल...

अंधःकार - लघूकथा

 *अंधःकार*      आशा नगरच्या झोपडपट्टीत छोट्याश्या झोपड्यात तुटक्या खाटेवर  पडून काशिनाथ आढ्याकडे एकटक पहात होता. लोकांकडे धुणीभांडी करणारी त्याची बायको सुमन सकाळीच कामावर निघून गेली होती. दिवसभर काबाडकष्ट करून ती तिन्हीसांजेला घरी परतत असे. एकुलता एक मुलगा विकास हा ही एका कुरीयर कंपनीत कामाला असल्यामुळे सकाळीच घराबाहेर पडला होता.       दोन वर्षापूर्वी एका अपघातात दोन्ही पाय गमावल्यामुळे काशिनाथ दिवसभर झोपड्यातच खाटेवर पडून राही. आजही तो तसाच खाटेवर पडून आढ्याकडे टक लावून पहात होता. त्याचे डोळे वारंवार भरून येत होते. त्याचा सारा जीवनपटच त्याच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा सरकत होता.       आशा नगरमधल्या एका ब-यापैकी चाळीत काशिनाथ, सुमन आणि त्यांचा लाडका विकास असं त्रिकोणी कुटुंब रहात असे. काशिनाथ एका नामवंत शाळेत शिपायाची नोकरी करीत असे. अत्यंत कामसू आणि प्रामाणिक असा त्याचा नावलौकिक होता.         पण अचानक एकदा मित्रांबरोबर फिरायला गेला असताना मित्रांच्या आग्रहाला बळी पडून काशिनाथने दारूचा प्...

गाथा क्रांतिकारकाची

 *क्रांतिकारकाची जीवनगाथा* (संस्कृती चांकाप्र महिला मंडळ उपक्रमाकरिता)       - स्वाती शृंगारपुरे      आज मी ज्या क्रांतिकारकाची ओळख करून देणार आहे, त्यांचे नाव आहे श्री.गजानन यशवंत कर्णिक.        २४ जून,१९१८रोजी कर्जतजवळील भिवपुरी गावात गजाननरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील डाक खात्यात नोकरीला होते. शिक्षणासाठी वडीलांनी गजाननरावांना पुण्यात भाऊसाहेब गडकरी ह्या स्नेह्यांकडे पाठवले.  पुण्यात चिमणबागेतील भाऊसाहेबांच्या घराजवळ अनेक क्रांतिकारक रहात असत.  त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन गजाननरावांनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले.       क्रांतिकारक मगनलाल पटेल ह्यांच्याबरोबर गजाननरावांनी एक धाडसी मोहीम आखली.... ती म्हणजे शनिवारवाड्यावर तिरंगा फडकविण्याची.  दि.४ मार्च, १९३२ रोजी तिरंगी झेंडा घडी करून  पोटाभोवती गुंडाळून त्यांनी वर नेहरू शर्ट चढवला व ते शनिवारवाड्याचे जिने चढून वर गेले. तेथे असलेल्या युनियन जॅक ची दोरी त्यांनी सोबत आणलेल्या ब्लेड ने कापून टाकली व तेथे भारतीय त...

कोणता म्हणावा सूर्य खरा?

Image
( कन्याकुमारी येथील सूर्योदयाचे नयनरम्य दृश्य पाहून सुचलेली कविता. येथे ज्ञानमणी,  ज्ञानसूर्य,  ज्ञानझरा हे शब्द  स्वामी विवेकानंदांकरिता वापरले आहेत. तर अरुण, दिनकर, वासरमणी, नारायण हे शब्द सूर्य ह्या शब्दाला समानार्थी म्हणून वापरले आहेत.) उधळीत केशर पृथ्वीतलावर     अरुण उगवला नभांगणी येता येता अवलोकी तो            भूलोकीचा ज्ञानमणी धरतीवरचा ज्ञानसूर्य            करितो जीवनज्ञान प्राप्त मानवंदना देई त्यास जणू           अवतरुनी दिनकर तप्त वासरमणी अन् ज्ञानमणी           आलिंगन देती परस्परां पाहुनी हा सोहळा आगळा           संतृप्त सागर,संतृप्त धरा    भारतभूची शान असे            स्वामीजींचे पावन स्थान किरणे बरसुनी नारायण हा            घाली स्वामीजींना स्नान एक असे तो ऊर्जास्त्रोत अन्            दुसरा अखंड ज्ञानझरा तुम्हीच सां...

कथा - आनंदाचे डोही

 आनंदाचे डोही      सकाळची वेळ. दिवस नुकताच सुरू झाला होता. अश्या रम्य वेळी उगवतीच्या सूर्यकिरणांना सोबत घेऊनच ब्रिटीश एअरवेजचं एक प्रवासी विमान मुंबई विमानतळावर उतरलं अन् त्यातून विद्याधर खाली उतरला. दूरवरून प्रवास करून आल्यामुळे तो खूपच थकला होता. विमानतळाबाहेर येऊन त्यानं नाशिक ला जाण्यासाठी भाड्याची गाडी ठरवली. गाडीच्या डीकीत सामानाच्या सुटकेसेस चढवून त्यानं स्वत:ला मागच्या सीटवर अक्षरशः झोकून दिलं अन् नाशिकच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू झाला.       कधी एकदा घरी पोहोचतोय असं त्याला झालं होतं.त्यानं डोळे मिटून घेतले. पण बंद पापण्यांआडून त्याचा भूतकाळ डोकं वर काढू लागला. अनेक सल मनात सलत होते. डोळे वारंवार भरून येत होते. कटू आठवणींचा दाह कमी करण्यासाठी विद्याधरनं डोळे आणखीनच गच्च मिटून घेतले अन् त्याचा संपूर्ण जीवनपटच त्याच्या बंद डोळ्यांसमोर उलगडू लागला.       विद्याधरला त्याचं बालपण आठवू लागलं.आई,अण्णा,धाकटी बहीण सुरेखा आणि तो असं त्यांचं चौकोनी कुटुंब नाशिकच्या काळाराम मंदिराच्या मागे एका वाड्यात रहात असत. अण्णा काळाराम मंद...