Posts

Showing posts from July, 2024

वारसा

 *स्वातीचे शब्दमोती*                     *वारसा* माझे डपाप कुटुंब      आहे साजिरे गोजिरे  सण उत्सवांचे इथे       सदा वाहतात वारे येता गोकुळ अष्टमी      जाती आनंदून सारे  चला जाऊ डहाणूला       दहीहंडी फोडू या रे  दोन दिवसांचा सण      आले आनंदा उधाण  सजे पाळणा कृष्णाचा      गाऊ भजन, कवन  करू उत्सवाचा काला       पालखीही मिरवूया  घरोघरी पूजेसाठी       गावातून फिरवूया  भेट होईल सा-यांची      कृष्णजन्मा निमित्ताने  ओढ लागली भेटीची         उचंबळती ही मने नव्या पिढीलाही देऊ      सण उत्सवांचा वसा पुढे चालवत नेऊ       संस्कृतीचा वारसा    -  ©️®️सौ. स्वाती शृंगारपुरे        बोरीवली,मुंबई  २४/०७/२०२४  📞 85913 25204

आषाढस्य प्रथम दिवसे

 नमस्कार  मी सौ. स्वाती सुबोध शृंगारपुरे, बोरीवली,       *आषाढमास, महाकवी कालिदास आणि मेघदूत*       आषाढमास म्हणजे अत्यंत सुखावह वातावरणाचा मास. अंगाची काहिली करणा-या ग्रीष्मापासून मान्सूनच्या आगमनाने आषाढापूर्वी सुटका झालेलीच असते. पण आषाढ येतो तोच सोबत पावसाच्या मुसळधार सरी घेऊन ! वातावरणात एक सुखद गारवा पसरू लागतो. सृष्टीवर हिरवाईचा साज चढू लागतो. अन् अश्या वेळी महाकवी कालिदासाची आठवण न झाली तरच नवल !       आषाढ शुद्ध प्रतिपदा हा दिवस महाकवी कालिदासांचा जन्मदिवस.  म्हणूनच हा दिवस कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.       राजा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी कालिदास हा एक रत्न होता. कालिदासाच्या वैयक्तिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी कालिदासाचा जन्म ख्रिस्तपूर्व काळात झाला असावा. तो राजा विक्रमादित्याच्या आश्रयास होता. ह्याच विक्रमादित्य राजाने नंतरच्या काळात 'विक्रम संवत्सर' सुरू केले.       कालिदासाने तत्कालीन प्रचलित असलेल्या संस्कृत भाषेत विपुल काव्य...